मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के महिला व बालके आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला व बालविकास विभागातर्फे आदिशक्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येतात या योजनांची जनजागृती करणार्या महिलांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी गावपातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. महिला व बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणात असणारी महिला व बालकांची लोकसंख्या तसेच राज्यातील महिलांच्या जीवनात येणार्या समस्या जाणून घेउन त्यांच्या सबलीकरणासाठी २०२५-२६ पासून राज्यात आदिशक्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यात महिलांसाठी सरकारकडून ज्या विविध योजना राबविण्यात येतात त्यांना प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
Fans
Followers